इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, २९ जुलै, २०२१

जिल्ह्यातील 37 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1400 क्युसेक विसर्ग

 


          कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 233.24 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

  पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदी- राशिवडे, हळदी, खडक कोगे व सरकारी कोगे. तुळशी नदी- बीड, आरे व बाचणी. कासारी नदी- यवलूज, ठाणे-आळवे व पुनाळ-तिरपन. कुंभी नदी- कळे व वेतवडे. वारणा नदी- चिंचोली, माणगाव, कोडोली, शिगांव, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, चावरे, खोची व दानोळी. कडवी नदी- सरुडपाटणे. दुधगंगा नदी- सिद्धनेर्ली, सुळकुड, बाचणी व दत्तवाड. वेदगंगा नदी- कुरणी, बस्तवडे, सुरुपली व चिखली असे एकूण 37 बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  तुळशी -89.38  दलघमी, वारणा -887.40, दूधगंगा - 606.84, कासारी- 64, कडवी - 71.24, कुंभी-64.88, पाटगाव- 95.88, चिकोत्रा- 40.60, चित्री - 53.41 (पूर्ण क्षमतेने भरला),  जंगमहट्टी -34.02, घटप्रभा -  44.17,  जांबरे- 23.23, आंबेआहोळ - 30.98 दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

          तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 40.9 फूट, सुर्वे 42.6, रुई 74.6, इचलकरंजी 71.6, तेरवाड 68, शिरोळ 70.4 तर नृसिंहवाडी  बंधाऱ्याची 70.4 फूट इतकी पाणी पातळी  सध्या आहे.

00000

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.