कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय)
: जिल्ह्यातील राधानगरी धरणात 233.07 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार
राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा
नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदी- राशिवडे, हळदी, खडक कोगे,
सरकारी कोगे, तारळे व शिरगाव. तुळशी नदी-
बीड व आरे, कासारी नदी- यवलूज,
ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन, बाजार -भोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेन व वालोली. कुंभी नदी- कळे व वेतवडे. वारणा नदी- चिंचोली, माणगाव, कोडोली,
शिगांव, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, चावरे, खोची व दानोळी. कडवी नदी- सवतेसावर्डे व सरुडपाटणे. दुधगंगा नदी- सिद्धनेर्ली, सुळकुड, बाचणी, दत्तवाड व सुळंबी. वेदगंगा नदी- निळपण, वाघापूर, कुरणी,
बस्तवडे, सुरुपली व चिखली असे एकूण 47 बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यातील
धरणांमध्ये तुळशी -93.40 दलघमी, वारणा -888.55, दूधगंगा - 606.84,
कासारी- 63.06, कडवी - 71.24, कुंभी-64.98, पाटगाव- 95.61, चिकोत्रा- 40.35,
चित्री - 53.41 (पूर्ण क्षमतेने भरला),
जंगमहट्टी -34.02, घटप्रभा - 44.17,
जांबरे- 23.23, आंबेआहोळ - 30.98 दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
तर
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 43.3 फूट,
सुर्वे 43.4, रुई 75.6, इचलकरंजी 73.9, तेरवाड 71, शिरोळ 72.3 तर नृसिंहवाडी बंधाऱ्याची 72.3 फूट इतकी पाणी पातळी सध्या आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.