इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, २८ जुलै, २०२१

जिल्ह्यातील 47 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1400 क्युसेक विसर्ग

 

 


          कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 233.07 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

  पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदी- राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे, तारळे व शिरगाव. तुळशी नदी- बीड व आरे, कासारी नदी- यवलूज, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन, बाजार -भोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेन व वालोली. कुंभी नदी- कळे व वेतवडे. वारणा नदी- चिंचोली, माणगाव, कोडोली, शिगांव, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, चावरे, खोची व दानोळी. कडवी नदी- सवतेसावर्डे व सरुडपाटणे. दुधगंगा नदी- सिद्धनेर्ली, सुळकुड, बाचणी, दत्तवाड व सुळंबी. वेदगंगा नदी- निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, सुरुपली व चिखली असे एकूण 47 बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  तुळशी -93.40  दलघमी, वारणा -888.55, दूधगंगा - 606.84, कासारी- 63.06, कडवी - 71.24, कुंभी-64.98, पाटगाव- 95.61, चिकोत्रा- 40.35, चित्री - 53.41 (पूर्ण क्षमतेने भरला),  जंगमहट्टी -34.02, घटप्रभा -  44.17,  जांबरे- 23.23, आंबेआहोळ - 30.98 दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

          तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 43.3 फूट, सुर्वे 43.4, रुई 75.6, इचलकरंजी 73.9, तेरवाड 71, शिरोळ 72.3 तर नृसिंहवाडी  बंधाऱ्याची 72.3 फूट इतकी पाणी पातळी  सध्या आहे.

00000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.