कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय): नागरिकांनो !घाबरू नका, काळजी
करू नका. सध्या आपण कोरोनाशी लढतो आहे . संयम बाळगा . येथील लोकप्रतिनिधींशी चर्चा
करून कुंभारगल्ली व परिसरातील पूरस्थितीवर मार्ग काढू. अशा आश्वस्त शब्दात
मुख्यमंत्र्यांनी शाहूपूरी ६ व्या गल्लीतील पूरबाधित राहिवांशांशी अत्यंत
आत्मियतेने संवाद साधला. पुरामुळे बाधित झालेल्या स्थितीची पाहणी करण्यासाठी ते आज
कोल्हापूरात आले होते .
आपत्कालीनस्थितीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी खूप
आधार दिल्याचे सांगून, २००५ व २०१९ पेक्षाही २०२१ साली आलेला पूर भयंकर असून
शासनाने आम्हाला भरीव मदत करावी अशी अपेक्षा तेथील नागरिकांनी व्यक्त केली .
याप्रसंगी
पालकमंत्री सतेज पाटील , ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ , खा . संजय मंडलिक , खा .
धैर्यशील माने, आ.जयंत आसगावकर, आ. ऋतूराज पाटील, मुख्य सचिव सिताराम कुंटे,
जिल्हाधिकारी राहूल रेखावार ,मनपा आयुक्त डॉ . कादंबरी बलकवडे आदी उपस्थित होते .
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.