रविवार, २१ जून, २०२०

13 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 800 तर कोयनेतून 2100 क्युसेक विसर्ग सुरू




          कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 65.45 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 800 क्युसेक विसर्ग तर कोयना धरणातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे. कासारी नदीवरील- यवलूज. दुधगंगा नदीवरील सिध्दनेर्ली व दत्तवाड असे एकूण 13 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 34.37 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 50.250 इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 43.63 दलघमी, वारणा 384.44 दलघमी, दूधगंगा 264.31 दलघमी, कासारी 31.05 दलघमी, कडवी 30.02 दलघमी, कुंभी 32.16 दलघमी, पाटगाव 34.88 दलघमी, चिकोत्रा 16.46 दलघमी, चित्री 13.78 दलघमी, जंगमहट्टी 8.21 दलघमी, घटप्रभा  41.66 दलघमी, जांबरे 9.13 दलघमी, कोदे (ल पा) 4.50 दलघमी असा आहे.
            तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 20.5 फूट, सुर्वे 20.6 फूट, रुई 51.9 फूट, इचलकरंजी 47.6 फूट, तेरवाड 46.6 फूट, शिरोळ 34.9 फूट, नृसिंहवाडी 32 फूट, राजापूर 20.6 फूट तर नजीकच्या सांगली 8.6  फूट व अंकली 11.2  फूट अशी आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.