शनिवार, २० जून, २०२०

17 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1908 तर कोयनेतून 2167 क्युसेक विसर्ग सुरू



          कोल्हापूर, दि. 20 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 65.95 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 850 व सिंचन विमोचकातून 1058 असा एकूण 1908 क्युसेक विसर्ग तर कोयना धरणातून 2167 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे. कासारी नदीवरील- यवलूज. वारणा नदीवरील -माणगाव व चिंचोली. दुधगंगा नदीवरील-सिध्दनेर्ली व दत्तवाड. वेदगंगा नदीवरील वाघापूर असे एकूण 17 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 34.37 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 44.894 इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 44.20 दलघमी, वारणा 379.49 दलघमी, दूधगंगा 260.86 दलघमी, कासारी 30.16 दलघमी, कडवी 30.35 दलघमी, कुंभी 32.39 दलघमी, पाटगाव 34.88 दलघमी, चिकोत्रा 16.39 दलघमी, चित्री 13.38 दलघमी, जंगमहट्टी 8.05 दलघमी, घटप्रभा  39.84 दलघमी, जांबरे 8.08 दलघमी, कोदे (ल पा) 4.27दलघमी असा आहे.
            तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 23.11 फूट, सुर्वे 23 फूट, रुई 53 फूट, इचलकरंजी 50.6 फूट, तेरवाड 47.6 फूट, शिरोळ 37 फूट, नृसिंहवाडी 35 फूट, राजापूर 24.9 फूट तर नजीकच्या सांगली 10.3  फूट व अंकली 14.5  फूट अशी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.