कोल्हापूर, दि. 17 (जिल्हा
माहिती कार्यालय) : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 4 गावांमधील 1709 व्यक्तींचे व
365 जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
स्थलांतरीत कुटुंबांची
तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे करवीर तालुक्यातील चिखली गावातील 895 व्यक्ती 237
जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. आंबेवाडी गावातील 615 व्यक्ती 112 जनावरांचे
स्थलांतर करण्यात आले आहे.
चंदगड- बाधित 1 गावातील 45 कुटुंबातील 184
व्यक्ती 16 जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. कोल्हापूर महानगरपालिका
क्षेत्रातील 8 कुटूंबातील 15 नागरिकांचे स्थलांतरीत करण्यात आले आहे.
अशा
जिल्ह्यातील एकूण 4 गावांमधील 1709 व्यक्तींना आणि 365 जनावरांना सुरक्षित ठिकाणी
स्थलांतरीत करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील 1 संक्रमण शिबीरात 15 जण
कोल्हापूर शहरात 1 ठिकाणी
उघडण्यात आलेल्या संक्रमण शिबीरात 5 पुरुष 9 महिला तर 1 लहान मुल अशा 15 जणांचा
समावेश आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.