कोल्हापूर, दि. 17 (जिल्हा माहिती कार्यालय)
: राधानगरी धरणात 232.47 दलघमी पाणीसाठा
आहे. आज सकाळी 7 वा. च्या प्राप्त अहवालानुसार राधानगरीतून विद्युत विमोचकासाठी 1400
व अलमट्टी धरणातून 200000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील -शिंगणापूर,राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड
व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी,
राशिवडे व खडक कोगे, कासारी नदीवरील -यवलूज,
दूधगंगा नदीवरील- दत्तवाड असे बारा बंधारे
पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 103.85 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 117.883
टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील
धरणांमध्ये पुढीलप्रमाणे
पाणीसाठा आहे. तुळशी 98.15 दलघमी, वारणा 974.19 दलघमी, दूधगंगा 719.12 दलघमी,
कासारी 78.56 दलघमी, कडवी 71.24 दलघमी, कुंभी 76.29 दलघमी, पाटगाव 105.24 दलघमी,
चिकोत्रा 43.12 दलघमी, चित्री 53.41 दलघमी, जंगमहट्टी 34.65 दलघमी, घटप्रभा 44.04 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, कोदे
(ल. पा.) 6.06 दलघमी असा आहे.
तसेच
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 23.11, सुर्वे 24 फूट, रुई 55.11
फूट, इचलकरंजी 55.6 फूट, तेरवाड 52 फूट, शिरोळ 51 फूट, नृसिंहवाडी 51.3 फूट,
राजापूर 40 फूट तर नजीकच्या सांगली 24 फूट व अंकली 30.2 फूट अशी आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.