कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय): उमेद
अभियानांतर्गत स्वयंसहाय्यता गटासाठी उत्कृष्ट लेखन करणाऱ्या पत्रकारांना राजमाता
जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार देण्यात येतो. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती
अभियानांतर्गत सन 2020-21 या वर्षात देण्यात येणाऱ्या या पुरस्कारासाठी महिला
सक्षमीकरण या विषयावर उत्कृष्ट लेखन केलेल्या इच्छुक व पात्र पत्रकारांनी आपले
प्रस्ताव 5 ऑक्टोबरपर्यंत सादर करावेत,
असे आवाहन जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या सहसंचालकांनी केले आहे.
सन 2020-21 या आर्थिक
वर्षात ग्रामीण भागातील उमेद अभियानांतर्गत स्वयंसहाय्यता गटासाठी उत्कृष्ट लेखन
करणाऱ्या पत्रकारांनी आपले नाव, पासपोर्ट साईज फोटो, दैनिकाचे नाव व केलेल्या
लेखनाचे प्रस्ताव जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामीण
जीवन्नोती अभियान, कोल्हापूर येथे सादर करावेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.