कोल्हापूर,
दि. 28 (जिमाका) : यशवंत पंचायत राज अभियान 2018-19 सालाकरिता राज्यातील
अत्युत्कृष्ट जिल्हा परिषद म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेची द्वितीय क्रमांकासाठी
तसेच विभागस्तरावर पुणे विभागात गडहिंग्लज पंचायत समितीची द्वितीय क्रमांकासाठी
निवड करण्यात आली आहे. याबाबत ग्राम विकास विभागाने आजच शासन निर्णय प्रसिध्द केला
आहे.
राज्यात
पंचायत राज संस्थांचे व्यवस्थापन व विकास कार्यात अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या
जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्राम पंचायतींसाठी 2005-06 या आर्थिक वर्षापासून
विभागस्तर व राज्यस्तरावर यशवंत पंचायत राज अभियान ही पुरस्कार योजना सुरु करण्यात
आली आहे. 2018-19 साठी राज्यस्तरावर प्रथम क्रमांकासाठी सिंधुदुर्ग, द्वितीय
क्रमांकासाठी कोल्हापूर आणि तृतीय क्रमांकासाठी यवतमाळ जिल्हा परिषदेची निवड
करण्यात आली आहे.
प्रत्येक
विभागस्तरीय समितीने पुणे विभागात पंचायत समिती कडेगाव, जि. सांगली प्रथम, पंचायत
समिती गडहिंग्लज,जि. कोल्हापूर द्वितीय तसेच पंचायत समिती कोरेगाव जि. सातारा
तृतीय क्रमांकासाठी निवड करण्यात आली आहे. कार्यासन अधिकारी शरद यादव यांनी आजच
शासन निर्णय प्रसिध्द केला आहे.
00 0 0
00
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.