शनिवार, ११ एप्रिल, २०२०

जिल्ह्यातील 15 निवारागृहांमध्ये राज्यातील 221 परराज्यातील 597 -जिल्हाधिकारी दौलत देसाई



       कोल्हापूर, दि. 11 (जि.मा.का) :-  जिल्ह्यातील 15 निवारागृहांमध्ये राज्यातील 221 आणि परराज्यातील 597 अशा एकूण 818 जणांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
        कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात शेठ रुईया विद्यालय, मंगळवार पेठ येथे राज्यातील  20 परराज्यातील 4 अशा 24 जणांचा समावेश असून याची क्षमता 50 जणांची आहे. रामकृष्ण हॉल, लोणार वसाहत राज्यातील 20 परराज्यातील 9 अशा 29 जणांचा समावेश असून याची क्षमता 50 जणांची आहे. मुलींची शाळा क्र. 6 लाईन बाजार येथे राज्यातील 1 परराज्यातील 9  असे एकूण 10 असून याची क्षमता 25 जणांची आहे.
       करवीर तालुका- सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी  येथे राज्यातील 2 परराज्यातील 35 एकूण 37 जण असून क्षमता 70 जणांची आहे. डी. फार्मसी कॉलेज उजळावाडी - राज्यातील 9, परराज्यातील 30 असे एकूण 39 असून याची एकूण क्षमता 50 जणांची आहे. कागल- डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह कागल येथे राज्यातील 3 परराज्यातील 97 एकूण 100 जण असून  क्षमता 113  जणांची आहे.  जयसिंगराव घाटगे विद्यालय येथे राज्यातील 14 परराज्यातील 108 असे एकूण 122 जण असून क्षमता 130 जणांची आहे.
            हातकणंगले-घुगरे सर यांचे निवासी गुरुकुल वडगाव येथे परराज्यातील 79 जण असून क्षमता 100 जणांची आहे. अशोकराव माने ग्रुप वाठार तर्फ वडगाव राज्यातील 3 परराज्यातील 103 असे एकूण 106 जण असून क्षमता 115 जणांची आहे. शहरी बेघर निवारा केंद्र इचलकरंजी येथे राज्यातील 45 परराज्यातील 8 एकूण 53 जण असून क्षमता 55 जणांची आहे.  राजीव गांधी भवन इचलकरंजी येथे राज्यातील 64 जण असून क्षमता ७० जणांची आहे.
        शिरोळ- शाळा क्रमांक 1 जयसिंगपूर येथे राज्यातील 13 परराज्यातील 17 असे एकूण 30 क्षमता 50 आहे.
        गडहिंग्लज- देवदासी छात्र वसतीगृह, संकेश्वर रोड, गडहिंग्लज येथे राज्यातील 9 परराज्यातील 1 एकूण 10 असून क्षमता 24 जणांची आहे,
            गगनबावडा- माधव विद्यालय गगनबावडा येथे राज्यतील 13 जण असून क्षमता 20 जणांची आहे. समाज कल्याण निवासी शाळा वसतीगृह गगनबावडा येथे राज्यातील 5 परराज्यातील 97 असे एकूण 102 असून क्षमता 105 जणांची आहे.
यामध्ये कर्नाटकातील 217,
तामिळनाडूमधील 214,
राजस्थानमधील 80,
मध्यप्रदेशमधील 42, 
उत्तर प्रदेशमधील 29,
केरळमधील 8,
पाँडेचरीमधील 1,
पश्चिम बंगालमधील 1
आंध्रप्रदेश  1
झारखंड 3
 बिहार 1 अशा एकूण 11 राज्यातील 597 जणांचा तसेच महाराष्ट्रातील 221 असे मिळून 818 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.