कोल्हापूर, दि. 10 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोरोनाच्या
पार्श्वभूमीवर लाभार्थीना विहीत वेळेत व पुरेसे अन्नधान्य उपलब्ध व्हावे यासाठी
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील नियमित
अंत्योदय योजनेतील लाभार्थींना प्रति शिधापत्रिका 10 किलो तांदूळ व 25 किलो गहू व
प्राधान्य कुटुंबातील लाभार्थीना प्रति व्यक्ती 2 किलो तांदूळ व 3 किलो गहू मोफत
वाटप करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी
दिली.
माहे मे 2021 करिता
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत अतिरिक्त अन्नधान्य अंत्योदय योजनेतील
लाभार्थीना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थीना प्रति व्यक्ती 2 किलो तांदूळ व 3
किलो गहू मोफत वाटप करण्यात येत असल्याचेही श्री. कवितके यांनी पत्रकाव्दारे
कळविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.