शुक्रवार, २७ मे, २०२२

शेतकऱ्यांसाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन

 


          कोल्हापूर, दि. 27 (जिमाका): खरीप हंगामासाठी शेतकऱ्याकडून बी- बियाणे, किटकनाशके यांची खरेदी सुरु आहे. वितरकांकडून खते, बियाणे किटकनाशके यांची विक्री जादा दराने केली जावू शकते. शेतकऱ्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी कृ‍षि विभागाकडून ठोस कारवाई करण्याच्या उद्देशाने तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील शेतकरी व महिला शेतकऱ्यांना निविष्ठा, बी-बियाणे, खते, किटकनाशके यांच्या खरेदी व विक्रीबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्यांनी जिल्हास्तरावरील तक्रार निवारण कक्षात तक्रार करावी. याबाबतच्या येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्याकरिता जिल्हास्तरावर निवारण कक्ष स्थापन केला आहे. तक्रार करण्यासाठी कृषि अधिकारी एस. एम. शेटे 0231-2652034/ 9049454649, जिल्हा परिषदेचे कृषि अधिकारी जी. पी. मठपती 0231-2655403/ 7385990593 यांच्याशी संपर्क साधावा.

000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.