कोल्हापूर, दि. 27 (जिल्हा माहिती कार्यालय) : दरवर्षी
60 लाख लोकांचा मृत्यू तंबाखू सेवनाने होतो. तंबाखूच्या व्यसनाला बळी पडून युवापिढी
उध्वस्त होत आहे. त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंब रस्त्यावर येतात हे थांबण्यासाठी
तंबाखू नियंत्रण कायद्याची कठोर अंमलबजावणी करून समाज स्वास्थ टिकवणे अत्यंत गरजेचे
आहे. त्यासाठी तंबाखूमुक्ती हाच पर्याय असल्याचे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी केले.
तंबाखू नियंत्रण कक्ष व मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील
पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्यामार्फत तंबाखू नियंत्रण कायदा कोट्पा 2003 यावर
कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यशाळेत राज्य अधिकारी जिया शेख, जिल्हा सल्लागार
चारुलता कणसे, साधन व्यक्ती अभिजीत संघवी आदी
उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना श्री.
काकडे म्हणाले, प्रभावी जनजागृती करून तंबाखू विरोधी चळवळीत लोकसहभाग वाढवला तर तंबाखू
सेवनाचे प्रमाण कमी होईल. पोलिस अधिकाऱ्यांनी कोटपा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर
जास्तीत जास्त कारवाया करणे गरजेचे आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे विभागीय अधिकारी अभिजित
संघही, राज्य अधिकारी जिया शेख, जिल्हा सल्लागार चारुशीला कणसे, डॉ. पाटील यांनी पावर
पॉइंट प्रेझेंटेशन च्या माध्यमातून कोटपा कायद्याच्या विविध कलमांची माहिती दिली.
कार्यशाळेची सूत्र सूत्रसंचालन विभागीय अधिकारी रंगनाथ जोशी यांनी केले
तर आभार प्रदर्शन क्रांती शिंदे यांनी केले. कार्यशाळेचा समारोप तंबाखू विरोधी शपथेचे
शपथ वाचन करून करण्यात आला याप्रसंगी जिल्ह्यातील मोठ्याप्रमाणावर अधिकारी कार्यशाळेस
उपस्थित होते.
0 0 0 0 00 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.