रविवार, ८ ऑगस्ट, २०२१

जिल्ह्यातील 15 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग

 


          कोल्हापूर, दि. 8 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 232.59 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदी- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे. वारणा नदी- चिंचोली व माणगांव, कासारी नदी- यवलूज. दुधगंगा नदी- दत्तवाड असे एकूण 15 बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  राधानगरी-232.59, तुळशी -92.14, वारणा -875.86, दूधगंगा – 626.30, कासारी- 61.25, कडवी -71.24(पूर्ण क्षमतेने भरला), कुंभी-62.85, पाटगाव 98.67, चिकोत्रा- 41.10, चित्री - 53.41 (पूर्ण क्षमतेने भरला),  जंगमहट्टी -34.65(पूर्ण क्षमतेने भरला), घटप्रभा -  44.17(पूर्ण क्षमतेने भरला),  जांबरे- 23.23(पूर्ण क्षमतेने भरला), आंबेआहोळ - 30.98 इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.

          तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 21.5 फूट, सुर्वे 21.4, रुई 51, इचलकरंजी 49, तेरवाड 46.3, शिरोळ 38.6 तर नृसिंहवाडी  बंधाऱ्याची  40.6 फूट इतकी पाणी पातळी आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.