कोल्हापूर, दि. 7 (जिल्हा माहिती
कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 232.80 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार
राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 तर सिंचन विमोचकातून 1428 असा एकुण 2828
क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील-
शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदी- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे व तारळे. वारणा नदी- चिंचोली, माणगांव, कासारी नदी- यवलूज, पुनाळ-तिरपन व
ठाणे-आळवे. दुधगंगा नदी- दत्तवाड व
सिद्धनेर्ली. असे एकूण 19 बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यातील
धरणांमध्ये राधानगरी-232.80,
तुळशी -91.43, वारणा -875.86, दूधगंगा – 627.91, कासारी- 61.25, कडवी -71.24(पूर्ण
क्षमतेने भरला), कुंभी-63.14, पाटगाव 98.59, चिकोत्रा- 40.97, चित्री - 53.41
(पूर्ण क्षमतेने भरला), जंगमहट्टी -34.65(पूर्ण
क्षमतेने भरला), घटप्रभा -
44.17(पूर्ण क्षमतेने भरला), जांबरे-
23.23(पूर्ण क्षमतेने भरला), आंबेआहोळ - 30.98 इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.
तर
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 24.8 फूट,
सुर्वे 24.6, रुई 54.9, इचलकरंजी 52.6, तेरवाड 47, शिरोळ 40.9 तर नृसिंहवाडी बंधाऱ्याची 41 फूट इतकी पाणी पातळी आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.