शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

जिल्ह्यातील 19 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 2828 क्युसेक पाण्याचा विसर्ग

 


          कोल्हापूर, दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 232.80 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 तर सिंचन विमोचकातून 1428 असा एकुण 2828 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदी- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे व तारळे. वारणा नदी- चिंचोली, माणगांव, कासारी नदी- यवलूज, पुनाळ-तिरपन व ठाणे-आळवे. दुधगंगा नदी- दत्तवाड व सिद्धनेर्ली. असे एकूण 19 बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  राधानगरी-232.80, तुळशी -91.43, वारणा -875.86, दूधगंगा – 627.91, कासारी- 61.25, कडवी -71.24(पूर्ण क्षमतेने भरला), कुंभी-63.14, पाटगाव 98.59, चिकोत्रा- 40.97, चित्री - 53.41 (पूर्ण क्षमतेने भरला),  जंगमहट्टी -34.65(पूर्ण क्षमतेने भरला), घटप्रभा -  44.17(पूर्ण क्षमतेने भरला),  जांबरे- 23.23(पूर्ण क्षमतेने भरला), आंबेआहोळ - 30.98 इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.

            तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 24.8 फूट, सुर्वे 24.6, रुई 54.9, इचलकरंजी 52.6, तेरवाड 47, शिरोळ 40.9 तर नृसिंहवाडी  बंधाऱ्याची  41 फूट इतकी पाणी पातळी आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.