कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती
कार्यालय) : जिल्ह्यामधील ग्रामीण भागात नवीन रास्तभाव
धान्य दुकान देण्याकरिता सन 2021 सालचा
जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. इच्छूक संस्थांनी / महिला बचत गटांनी/ स्थानिक
स्वराज्य संस्थांनी विहीत मुदतीत सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन
जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी केले आहे.
पन्हाळा- गुडे/सोमवार
पेठ, नावली, मौ. बहिरेवाडी, पिंपळे तर्फ
सातवे, मौजे कोतोली व वारणा. कागल- बोरवडे, माद्याळ व पिंपळगाव खुर्द. करवीर- शिरोली दुमाला, येवती, खेबवडे व गर्जन, कळंबे तर्फ कळे,
घानवडे, सोनतळी व वसगडे. शाहुवाडी- मोळावडे, वडगाव, करंजोशी, ओकोली व कोळगाव.आजरा-
दाभिळ.गगनबावडा- पळसंबे, तळये बु. व
खोकुर्ले अशा एकुण 26 गावांसाठी नवीन रास्तभाव धान्य दुकानांकरिता अर्ज करण्यासाठी
कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
नवीन रास्तभाव धान्य दुकानाकरिता अर्ज
करण्यासाठी वेळापत्रक पुढीलप्रमाणे-
संस्थांना अर्ज करण्यास मुदत- दि.
20 सप्टेंबरपर्यंत. प्राप्त अर्जाची प्राथमिक तपासणी, छाननी, जागेची तपासणी व इतर
अनुषंगिक कार्यवाही पुर्ण करणे- दि. 21 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर. नवीन दुकाने मंजुर
करणे- दि. 21 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2021
असे आहे.
अर्जदार संस्थांनी अर्ज करण्यासाठी व अधिक
माहितीसाठी संबंधित तहसिलदार कार्यालयाशी संपर्क साधावा. अर्ज करण्यासाठीच्या
पात्रतेचे निकष व अटी शर्ती संबंधीत तहसिल कार्यालय, पंचायत समिती, गाव चावडी व संबंधित ग्रामपंचायत येथे प्रसिद्ध
करण्यात आल्या आहेत.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.