कोल्हापूर, दि. 6 (जिल्हा माहिती कार्यालय) :
जिल्ह्यातील राधानगरी धरणात 234.76 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत
विमोचकातून 1400 तर सिंचन विमोचकातून 2856 असा एकुण 4256 क्युसेक पाण्याचा विसर्ग
सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील-
शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदी- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे व तारळे. वारणा नदी- चिंचोली, माणगांव व खोची. कासारी नदी- यवलूज, पुनाळ-तिरपन व
ठाणे-आळवे. दुधगंगा नदी- दत्तवाड व
सिद्धनेर्ली. वेदगंगा नदी- वाघापूर, कुरणी, बस्तवडे, सुरुपली व चिखली असे
एकूण 25 बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यातील
धरणांमध्ये तुळशी -90.43
दलघमी, वारणा -880.46, दूधगंगा – 626.30, कासारी- 61.25, कडवी -71.24, कुंभी-63.14,
पाटगाव 98.27, चिकोत्रा- 40.85, चित्री - 53.41 (पूर्ण क्षमतेने भरला), जंगमहट्टी -34.65, घटप्रभा - 44.17,
जांबरे- 23.23, आंबेआहोळ - 30.98 दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
तर
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 28.08 फूट,
सुर्वे 27.10, रुई 57.06, इचलकरंजी 54.06, तेरवाड 47.9, शिरोळ 41.06 तर
नृसिंहवाडी बंधाऱ्याची 41.06 फूट इतकी पाणी पातळी सध्या आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.