शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०२१

जिल्ह्यातील 25 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 4256 क्युसेक विसर्ग

 

          कोल्हापूर, दि. 6 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 234.76 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 तर सिंचन विमोचकातून 2856 असा एकुण 4256 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदी- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे व तारळे. वारणा नदी- चिंचोली, माणगांव व खोची. कासारी नदी- यवलूज, पुनाळ-तिरपन व ठाणे-आळवे. दुधगंगा नदी- दत्तवाड व सिद्धनेर्ली. वेदगंगा नदी-  वाघापूर, कुरणी, बस्तवडे, सुरुपली व चिखली असे एकूण 25 बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  तुळशी -90.43 दलघमी, वारणा -880.46, दूधगंगा – 626.30, कासारी- 61.25, कडवी -71.24, कुंभी-63.14, पाटगाव 98.27, चिकोत्रा- 40.85, चित्री - 53.41 (पूर्ण क्षमतेने भरला),  जंगमहट्टी -34.65, घटप्रभा -  44.17,  जांबरे- 23.23, आंबेआहोळ - 30.98 दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

            तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 28.08 फूट, सुर्वे 27.10, रुई 57.06, इचलकरंजी 54.06, तेरवाड 47.9, शिरोळ 41.06 तर नृसिंहवाडी  बंधाऱ्याची  41.06 फूट इतकी पाणी पातळी  सध्या आहे.

00000

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.