सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१

जिल्ह्यातील 2 बंधारे पाण्याखाली राधानगरीतून 800 क्युसेक्सचा विसर्ग

 

          कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 221.57 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील- रुई व इचलकरंजी असे एकूण 2 बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  राधानगरी-221.57 तुळशी -97.56, वारणा -886.24, दूधगंगा-664.99, कासारी- 68.92, कडवी -71.24 (पूर्ण क्षमतेने भरला), कुंभी-69.86, पाटगाव 96.68, चिकोत्रा- 42.48, चित्री -52.54, जंगमहट्टी -31.61, घटप्रभा -30.31, जांबरे- 23.23(पूर्ण क्षमतेने भरला), आंबेआहोळ - 30.98 इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.

          तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे -राजाराम 14.3, फूट, सुर्वे 17.1, रुई 42.3, इचलकरंजी 38.9, तेरवाड 37.8, शिरोळ -29.3  तर नृसिंहवाडी  बंधाऱ्याची  26.6 फूट इतकी पाणी पातळी आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.