कोल्हापूर, दि. 27 (जि.मा.का.) : खरीप हंगाम 2020-21 पासून 2022-23 पर्यंत प्रधानमंत्री पिक विमा योजनेची अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी, विमा क्षेत्र घटक धरुन अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये शेतक-यांस टाळता न येण्याजोग्या कारणामुळे झालेल्या नुकसानीस विमा संरक्षणाच्या बाबी नमुद केलेल्या आहेत. ज्या अधिसूचित क्षेत्रामध्ये हंगामातील प्रतिकुल परिस्थिती, मात्र सर्वसाधारण काढणीच्या 15 दिवस आधीपर्यंत पूर, पावसातील खंड, दुष्काळ इ. बाबींमुळे शेतक-याच्या अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असल्यास विमा संरक्षण देय होईल, असे नमूद आहे. या बाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत 5 टक्के क्षेत्राचे सर्वेक्षण करण्याचे आदेश प्र. जिल्हाधिकारी तथा प्रधानमंत्री पीक विमा
योजनेच्या जिल्हा स्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष किशोर पवार यांनी दिले आहेत.
खरीप हंगाम 2021 मध्ये शिरोळ तालुक्यातील एकूण 7 पैकी 6 महसूल मंडळामध्ये, दि.
22 ते 25 जुलै 2021 या कालावधीत अतिवृष्टी, धरणातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग, नद्या नाल्यांची वाढलेली पाण्याची पातळी यामुळे शिरोळ तालुक्यातील शिरोळ, नृसिंहवाडी, जयसिंगपूर, शिरढोण, दत्तवाड व कुरूंदवाड या अधिसूचित क्षेत्रात अतिवृष्टी व पूराचे पाणी शिरुन अधिसूचित पिकांच्या नुकसानीचा समावेश आहे.
अधिसूचित महसूल मंडळातील, अधिसूचित पिकांच्या नुकसानीच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे सर्व्हेक्षणानुसार 6 महसूल मंडळ/मंडळ गटात सोयाबीन व भुईमूग या पिकांची उत्पादकता 50 टक्के पेक्षा कमी अपेक्षित / येणार आहे असे निदर्शनास आले आहे.
तपशील खालीलप्रमाणे-
नं. |
तातालुका |
अधिसूचित पिक |
अधिसूचित क्षेत्र/ महसूल मंडल गट |
सरासरी उत्पादकता कि./हे. |
प्रत्यक्ष अपेक्षित उत्पादकता कि./हे. |
% |
1 |
fशिरोळ |
सोयाबीन |
शिरोळ +नृसिहवाडी |
2072.8 |
0.00 |
0.00 |
जयसिंगपूर + नांदणी |
1818.6 |
573.07 (जयसिंगपूर
मंडळ) |
31.51 |
|||
शिरढोण+दत्तवाड+ कुरूंदवाड |
1703.3 |
0.00 |
0.00 |
|||
2 |
fशिरोळ |
भुईमूग |
शिरोळ + नृसिहवाडी + नांदणी + जयसिंगपूर |
1330.9 |
383.33 (जयसिंगपूर
मंडळ) 0.00 (शिरोळ
मंडळ) 0.00(नृसिहवाडी
मंडळ) |
28.80 0.00 0.00 |
शिरढोण+दत्तवाड+ कुरूंदवाड |
1209.0 |
0.00 |
0.00 |
हंगामातील प्रतिकुल
परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित
करण्यासाठी जाहिर सूचना काढण्यात
येत आहे. त्यानुसार वरील
अधिसूचित महसूल मंडळातील ज्या
शेतक-यांनी सोयाबीन व भूईमूग पिक विमा हप्ता
रक्कम 23 जुलै 2021 अखेर अथवा त्यापुर्वी भरली आहे किंवा
त्यांच्या खात्यातून विमा हप्ता
रक्कम वजा करुन घेण्यात
आलेली आहे,
असेच शेतकरी मदतीसाठी पात्र
राहातील. तसेच अपेक्षित नुकसान
भरपाई रक्कमेच्या 25 टक्के मर्यादेपर्यंत नुकसान भरपाईची रक्कम आगावू
देण्याचे निश्चित करण्यात येत आहे व ही मदत
अंतिम येणा-या नुकसान
भरपाई रक्कमेतून समायोजीत करण्यात
येईल.
कृषि व पशुसंवर्धन
दुग्धव्यसाय विकास व मत्स्यव्यवसाय शासन निर्णयानुसार हंगामातील प्रतिकुल
परिस्थितीत नुकसान
भरपाई निश्चित करण्यासाठी
5 अधिसूचित क्षेत्रातील शिरोळ, नृसिंहवाडी, जयसिंगपूर, शिरढोण, दत्तवाड व कुरूंदवाड अशा एकूण 6 महसूल मंडळासाठी अधिसूचना निर्गमित करण्यात येत आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.