कोल्हापूर, दि. 3 (जिल्हा माहिती कार्यालय) :
जिल्ह्यातील राधानगरी धरणात 233.40 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत
विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील-
शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदी- हळदी व खडक कोगे. वारणा
नदी- चिंचोली, माणगाव, खोची व दानोळी. कासारी
नदी- यवलूज, पुनाळ-तिरपन व ठाणे-आळवे. दुधगंगा
नदी- दत्तवाड, बाचणी, सुळकुड व सिद्धनेर्ली असे एकूण 20 बंधारे पाण्याखाली
आहेत.
जिल्ह्यातील
धरणांमध्ये तुळशी -86.18
दलघमी, वारणा -842.83, दूधगंगा – 592.03, कासारी- 58.08, कडवी – 71.24,
कुंभी-61.09, पाटगाव- 96.12, चिकोत्रा- 39.34, चित्री - 53.41 (पूर्ण क्षमतेने
भरला), जंगमहट्टी -34.65, घटप्रभा - 44.17,
जांबरे- 23.23, आंबेआहोळ - 30.98 दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
तर
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 23.7 फूट,
सुर्वे 25, रुई 57.6, इचलकरंजी 58.4, तेरवाड 56.6, शिरोळ 56.3 तर नृसिंहवाडी बंधाऱ्याची 55.8 फूट इतकी पाणी पातळी सध्या आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.