इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०

राधानगरीतून 1000; अलमट्टीतून 38922 क्युसेक विसर्ग सुरू

 


          कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) :  राधानगरी धरणात 231.46 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या प्राप्त अहवालानुसार राधानगरी धरणातून 1000, कोयनेतून 2000 तर अलमट्टी धरणातून 38922 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प, जंगमहट्टी मध्यम प्रकल्प, चिकोत्रा मध्यम प्रकल्प, दूधगंगा मोठा प्रकल्प, कुंभी मध्यम प्रकल्प व वारणा मोठा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

पंचगंगा नदीवरील रूई व इचलकरंजी असे दोन बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 105.15टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 123.081 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 98.29 दलघमी, वारणा 974.19 दलघमी, दूधगंगा 719.12 दलघमी, कासारी 77.52 दलघमी, कडवी 70.97 दलघमी, कुंभी 76.43 दलघमी, पाटगाव 105.17 दलघमी, चिकोत्रा 43.115 दलघमी, चित्री 53.410 दलघमी, जंगमहट्टी 34.651 दलघमी, घटप्रभा  44.050 दलघमी, जांबरे 23.230 दलघमी, कोदे (ल. पा.) 6.06 दलघमी असा आहे.

          तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 14.9, सुर्वे 16.8 फूट, रुई 42.6 फूट, इचलकरंजी 39 फूट, तेरवाड 38.3 फूट, शिरोळ 31 फूट, नृसिंहवाडी 27 फूट, राजापूर 17.6 फूट तर नजीकच्या सांगली 9  फूट व अंकली  9.9 फूट अशी आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.