कोल्हापूर, दि.
22 (जिमाका): जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील अपंग-अव्यंग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहान देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना या कार्यालयामार्फत कार्यान्वीत आहे. किमान 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या अपंग वधू किंवा वराने अपंगत्व नसलेल्या वधू किंवा वराशी विवाह केल्यास या योजनेतंर्गत रुपये 50 हजार रुपयाचे अर्थ सहाय्य दिले जाते.
रक्कम रुपये 25 हजारचे बचत प्रमाणपत्र, रक्कम रुपये 20 हजार रोख स्वरुपात, रक्कम रुपये 4 हजार 500 संसार उपयोगी साहित्य /वस्तू खरेदीसाठी देण्यात येईल व रक्कम रुपये 500 स्वागत
सभारंभाच्या कार्यक्रमाचा खर्च करण्यासाठी देण्यात येईल.
योजनेच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे -
1. वधू अथवा वराकडे
अपंग व्यक्ती अधिनियमाप्रमाणे किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा
जास्त
अपंगत्वाचे सक्षम प्राधिकाऱ्याने
दिलेले प्रमाणपत्र असावे. ( जिल्हा शल्यचिकित्सक यांचे वैद्यकीय
प्रमाणपत्र )
2. अपंग वधू किंवा
वर यापैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
3.विवाहित वधू
व वराचा प्रथम विवाह असावा. वधू अथवा वर घटस्फोटीत असल्यास अशा प्रकारची
मदत यापूर्वी घेतलेली नसावी.
4. विवाह हा कायदेशीररित्या
विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदविलेला असावा.
5. विवाह झाल्यानंतर
किमान एक वर्षाच्या आत या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित समाज
कल्याण अधिकारी यांच्याकडे अर्ज
करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील जास्तीत-जास्त
पात्र अपंग-अव्यंग व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन
जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.