कोल्हापूर, दि. 28 (जिमाका):
स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये माजी सैनिक प्रवर्गातून महाराष्ट्र राज्यात एकूण 7
हजार 425 सुरक्षा रक्षक पदांची भरती (कायमस्वरुपी) करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने
जिल्ह्यातील सैन्यदलातून सेवानिवृत्त झालेल्या इच्छुक माजी सैनिकांनी 3 नोव्हेंबरपर्यंत
आपल्या डिसचार्ज पुस्तक, ओळखपत्र व एम्लॉयमेंट कार्डसह सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर
येथे प्रत्यक्ष भेट देवून आपले नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी
केले आहे.
यासाठी
उमेदवाराचे वय 1 ऑक्टोबर रोजी 45 वर्षापेक्षा कमी असावे, कमीत कमी 8 वी पास पण 12
वी पास नसावा, कमीत कमी 15 वर्षे सैन्यसेवा, जास्तीत-जास्त Hav and Below, सैन्यातील
चारित्र्य कमीत-कमी गुड व AYE/SHAPE-I याप्रमाणे शारिरीक व शैक्षणिक पात्रता
राहील.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.