मंगळवार, १ सप्टेंबर, २०२०

7 बंधारे पाण्याखाली राधानगरीतून 1400; अलमट्टीतून 26922 क्युसेक विसर्ग सुरू

 

 

          कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय) :  राधानगरी धरणात 230.70 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या प्राप्त अहवालानुसार राधानगरी धरणातून 1400, कोयनेतून 2056 तर अलमट्टी धरणातून 26922 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प, जंगमहट्टी मध्यम प्रकल्प, पाटगाव मध्यम प्रकल्प व कासारी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.

पंचगंगा नदीवरील- राजाराम, शिंगणापूर, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ असे एकूण 7 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 102.11 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 123.081 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 98.10 दलघमी, वारणा 945.98 दलघमी, दूधगंगा 712.68 दलघमी, कासारी 78.56 दलघमी, कडवी 71.24 दलघमी, कुंभी 72.52 दलघमी, पाटगाव 105.24 दलघमी, चिकोत्रा 43.10 दलघमी, चित्री 53.410 दलघमी, जंगमहट्टी 34.650 दलघमी, घटप्रभा  43.930  दलघमी, जांबरे 23.230 दलघमी, कोदे (ल पा) 6.060 दलघमी असा आहे.

          तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 18.1 फूट, सुर्वे 18.10 फूट, रुई 46.5 फूट, इचलकरंजी 44 फूट, तेरवाड 42 फूट, शिरोळ 33 फूट, नृसिंहवाडी 28.6 फूट, राजापूर 19.6 फूट तर नजीकच्या सांगली 9.6  फूट व अंकली 12.2 फूट अशी आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.