कोल्हापूर दि. १० : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणूका २०१२ जाहीर केल्या आहेत. दि. ३ जानेवारी २०१२ पासून आचारसंहिताही लागू झालेली आहे. हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी नगरपरिषद, इचलकरंजी व वडगांव नगरपालिका, वडगांव यांच्या कार्यक्षेत्राच्या हद्दीतील जागा सोडून इतर ठिकाणी ही निवडणूक घेण्यात येत आहे. निवडणुका निर्भय व न्याय वातावरणात होणे आवश्यक असल्याने निवडणूक प्रक्रियेत होणारा सार्वजनिक उपद्गव टाळण्याची गरज असल्याने हातकणंगले तालुका कार्यकारी दंडाधिकारी समीर शिंगटे यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम १९७३ चे कलम १४४ अन्वये असलेल्या अधिकारास अनुसरुन २०१२ जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीच्या कालावधीत पुढील आदेश जारी केले आहेत.
कोणत्याही कारणासाठी सार्वजनिक सभा संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांच्या किंवा पोलीस अधीक्षकांच्या पूर्व परवानगीशिवाय घेता येणार नाही. कोणत्याही प्रकारची मिरवणूक संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस अधिकार्यांच्या किंवा पोलीस अधीक्षकांची पूर्व परवानगी शिवाय काढता येणार नाही. कोणत्याही व्यक्तीस/संस्थेस लाऊड स्पिकरचा वापर सक्षम पोलीस अधिकार्यांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही. कोणत्याही व्यक्ती, संस्थेस फिरत्या वाहनात लाऊड स्पिकर लावून प्रचार करता येणार नाही. निवडणुकाबाबत लाऊड स्पिकरचा वापर सकाळी ६ वाजण्यापूर्वी व रात्रौ १० वाजल्यानंतर करता येणार नाही. शस्त्र अधिनियम १९५९ खालील धारण केलेल्या कोणत्याही परवाना धारकांना हातकणंगले तालुका हद्दीतील कार्यक्षेत्रामध्ये आपली हत्यारे एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी वाहून नेण्याच्या तसेच अंगावर बाळगण्यास या आदेशान्वये बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावत असलेल्या शासकीय कर्मचार्यांना (पोलीस अधिकारी व कर्मचारी ) यांना लागू राहणार नाही. तसेच ज्या परवानाधारकास रुढीप्रमाणे बंदूक डिसप्ले
करण्याचा अधिकार आहे त्यांना हा आदेश लागू राहणार नाही. २०१२ जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या कालावधीत मोटार गाड्या वाहने ही कोणत्याही परिस्थितीत तीन पेक्षा अधिक वाहनांच्या ताफ्यात चालविण्यात येऊ नयेत. मात्र सदर आदेश सर्व मोठ्या संरक्षक गाड्याच्या ताफ्यास तो केंद्ग किंवा राज्य शासनाचे मंत्री किंवा कोणत्याही व्यक्तीस घेवून जात असल्यास तेंव्हा त्यांचे सुरक्षिततेविषयी लागू असलेल्या वाहनांच्या संदर्भात लागू राहणार नाही. तसेच सदर आदेश शासकीय कामावर असलेल्या वाहनांच्या संदर्भास लागू असणार नाही.
निवडणुकीचे कालावधीत सर्व शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयाच्या आवारात किंवा शासकीय विश्रामगृहात व त्यांच्या आवारात किंवा जेथे सार्वजनिक निधी गुंतवलेला आहे अशा कोणत्याही धर्मादाय संस्थेच्या आवारात, विश्रामगृहात किंवा इतर अशा कोणत्याही संस्थेच्या आवारात खालील बाबी करण्यास मनाई करण्यात येत आहे.
कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढणे किंवा सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे अथवा निवडणुकविषयक वाद्य वाजविणे, गाणी म्हणणे, कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणे, सदरचे बंधन निवडणुकीच्या काळामध्ये प्रचार सभा, मेळावे वगैरे कार्यक्रम स्थळी लागू असतील. तसेच अशा कार्यक्रमाचे स्थळी विनापरवानगी बॅनर्स, कटआऊटस वगैरे लावण्याचे नाहीत व परवानगीने लावलेले बॅनर्स, कटआऊटस कार्यक्रम संपताच काढून घेण्याचे आहेत. सदरचा आदेश दि. ३ जानेवारी २०१२ पासून दि. १० फेब्रुवारी २०१२ अखेरपर्यंत लागू राहील, असेही हातकणंगलेच्या कार्यकारी दंडाधिकार्यांनी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.