बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१

राधानगरी धरणातून 1400 क्युसेक विसर्ग जिल्ह्यातील 31 बंधारे पाण्याखाली

 


 

      कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 232.70 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये आज राधानगरी-232.70, तुळशी -97.46, वारणा -972.83, दूधगंगा-714.37, कासारी- 76.99, कडवी -71.24, कुंभी-75.10, पाटगाव 105.24, चिकोत्रा- 43.115, चित्री -53.410, जंगमहट्टी -34.65, घटप्रभा -44.170, जांबरे- 23.230 आंबेआहोळ - 30.978  इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 31, फूट, सुर्वे- 31, रुई 61, इचलकरंजी 57.3, तेरवाड 48.5, शिरोळ -44  तर नृसिंहवाडी 44.9 फूट इतकी पाणी पातळी आहे.

जिल्ह्यातील पडणाऱ्या पावसामुळे नदीवरील 32 बंधारे पाण्याखाली आहे. यामध्ये पंचगंगा नदीवरील -शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- शिरगांव, राशिवडे, हळदी, सरकारी कोगे व खडक कोगे, वारणा नदीवरील- चिंचोली,  माणगांव, खोची, तांदूळवाडी  व कोडोली, कासारी नदीवरील- यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, वाळोली, बाजारभोगाव, पेंडाखळे व करंजफेण, कुंभी नदीवरील -शेणवडे, दुधगंगा नदीवरील- तुरंबे, कसबा वाळवे, सुळकुड, बाचणी व दत्तवाड, तुळशी नदीवरील- बीड असे एकूण 31 बंधारे पाण्याखाली आहेत.

 

00000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.