कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती
कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 232.70 दलघमी पाणीसाठा आहे. आज
दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक
पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील
धरणांमध्ये आज राधानगरी-232.70, तुळशी -97.46,
वारणा -972.83, दूधगंगा-714.37, कासारी- 76.99, कडवी -71.24, कुंभी-75.10, पाटगाव
105.24, चिकोत्रा- 43.115, चित्री -53.410, जंगमहट्टी -34.65, घटप्रभा -44.170,
जांबरे- 23.230 आंबेआहोळ - 30.978 इतका
दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 31, फूट, सुर्वे-
31, रुई 61, इचलकरंजी 57.3, तेरवाड 48.5, शिरोळ -44 तर नृसिंहवाडी 44.9 फूट इतकी पाणी पातळी
आहे.
जिल्ह्यातील
पडणाऱ्या पावसामुळे नदीवरील 32 बंधारे पाण्याखाली आहे. यामध्ये पंचगंगा नदीवरील -शिंगणापूर, राजाराम,
सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती
नदीवरील- शिरगांव, राशिवडे, हळदी, सरकारी कोगे व खडक कोगे, वारणा नदीवरील- चिंचोली, माणगांव, खोची, तांदूळवाडी व कोडोली, कासारी नदीवरील- यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, वाळोली, बाजारभोगाव,
पेंडाखळे व करंजफेण, कुंभी नदीवरील
-शेणवडे, दुधगंगा नदीवरील- तुरंबे,
कसबा वाळवे, सुळकुड, बाचणी व दत्तवाड, तुळशी
नदीवरील- बीड असे एकूण 31 बंधारे पाण्याखाली आहेत.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.