कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) :
जिल्ह्यातील राधानगरी धरणात 234.21 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार
राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 700 व सिंचन विमोचकातून 1428 असा एकूण 2128
क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्र. 3
खुला झाला आहे.
जिल्ह्यातील
धरणांमध्ये आज राधानगरी-234.21, तुळशी -97.91,
वारणा -974.18, दूधगंगा-719.12, कासारी- 78.04, कडवी -69.18, कुंभी-76.69, पाटगाव
105.10, चिकोत्रा- 43.12, चित्री -53.27, जंगमहट्टी -34.65, घटप्रभा -42.14,
जांबरे- 23.23 आंबेआहोळ - 30.98 इतका
दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 15.1, फूट, सुर्वे- 18,
रुई 43.6, इचलकरंजी 40, तेरवाड 37, शिरोळ -27.9 तर नृसिंहवाडी 27 फूट इतकी पाणी पातळी
आहे.
जिल्ह्यातील
पंचगंगा नदीवरील रुई व इचलकरंजी हे 2 बंधारे पाण्याखाली आहेत.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.