शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१

राधानगरी धरणातून 700 क्युसेक्स विसर्ग जिल्ह्यातील 11 बंधारे पाण्याखाली

 

 

      कोल्हापूर, दि. 17 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 232.10 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 700 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये आज राधानगरी-232.10, तुळशी -97.77, वारणा -972.83, दूधगंगा-718.44, कासारी- 77.52, कडवी -71.24, कुंभी-74.88, पाटगाव 105.10, चिकोत्रा- 43.115, चित्री -53.410, जंगमहट्टी -34.65, घटप्रभा -42.610, जांबरे- 23.230 आंबेआहोळ - 30.978  इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 18.3, फूट, सुर्वे- 19.8, रुई 50, इचलकरंजी 48, तेरवाड 44.6, शिरोळ -38.6  तर नृसिंहवाडी 38.11 फूट इतकी पाणी पातळी आहे.

जिल्ह्यातील पडणाऱ्या पावसामुळे नदीवरील 11 बंधारे पाण्याखाली आहे. यामध्ये पंचगंगा नदीवरील -शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील-  सरकारी कोगे व खडक कोगे, वारणा नदीवरील- चिंचोली  दुधगंगा नदीवरील- दत्तवाड असे एकूण 11 बंधारे पाण्याखाली आहेत.

 

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.