रविवार, २६ सप्टेंबर, २०२१

राधानगरी धरणातून 2128 क्युसेक्स विसर्ग जिल्ह्यातील 2 बंधारे पाण्याखाली

 


      कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 232.32 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 700 व सिंचन विमोचकातुन 1428 असा एकुण 2128 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये आज राधानगरी-232.32, तुळशी -98.15, वारणा -974.19, दूधगंगा-719.12, कासारी- 78.56, कडवी -69.74, कुंभी-76.65, पाटगाव 104.25, चिकोत्रा- 43.12, चित्री -53.36, जंगमहट्टी -34.65, घटप्रभा -37.70, जांबरे- 23.230 आंबेआहोळ - 30.978  इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 14.8, फूट, सुर्वे- 17.4, रुई 42.6, इचलकरंजी 39, तेरवाड 37.6, शिरोळ -27.9  तर नृसिंहवाडी 28.8 फूट इतकी पाणी पातळी आहे.

जिल्ह्यातील पंचगंगा नदीवरील – रुई व  इचलकरंजी  हे 2 बंधारे पाण्याखाली आहेत.

000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.