सोमवार, २० सप्टेंबर, २०२१

राधानगरी धरणातून 700 क्युसेक्स विसर्ग जिल्ह्यातील 1 बंधारा पाण्याखाली

 


 

      कोल्हापूर, दि. 20 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 230.81 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 700 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये आज राधानगरी-230.81, तुळशी -98.10, वारणा -972.83, दूधगंगा-719.12, कासारी- 77.52, कडवी -71.24, कुंभी-75.54, पाटगाव 104.33, चिकोत्रा- 43.115, चित्री -52.920, जंगमहट्टी -34.65, घटप्रभा -40.030, जांबरे- 23.230 आंबेआहोळ - 30.978  इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 13.3, फूट, सुर्वे- 16.2, रुई 41.9, इचलकरंजी 38, तेरवाड 36.3, शिरोळ -27.9  तर नृसिंहवाडी 29.3 फूट इतकी पाणी पातळी आहे.

जिल्ह्यातील पंचगंगा नदीवरील – इचलकरंजी  हा 1 बंधारा पाण्याखाली आहे.

 

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.