कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील
राधानगरी धरणात 232.16 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत
विमोचकातून 700 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील
धरणांमध्ये आज राधानगरी-232.16, तुळशी -97.62, वारणा
-972.83, दूधगंगा-717.08, कासारी- 76.99, कडवी -71.24, कुंभी-74.88, पाटगाव
105.24, चिकोत्रा- 43.115, चित्री -53.410, जंगमहट्टी -34.65, घटप्रभा -43.450,
जांबरे- 23.230 आंबेआहोळ - 30.978 इतका
दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.
बंधाऱ्यांची
पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 26.5, फूट, सुर्वे- 26, रुई 57, इचलकरंजी 55, तेरवाड 48.5,
शिरोळ -45 तर नृसिंहवाडी 45.6 फूट इतकी पाणी पातळी आहे.
जिल्ह्यातील पडणाऱ्या
पावसामुळे नदीवरील 18 बंधारे पाण्याखाली आहे. यामध्ये पंचगंगा नदीवरील -शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड
व शिरोळ, भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, सरकारी कोगे व खडक कोगे, वारणा नदीवरील- चिंचोली, माणगांव व तांदूळवाडी, कासारी नदीवरील- यवलूज, पुनाळ तिरपण व ठाणे आळवे, दुधगंगा
नदीवरील- दत्तवाड असे एकूण 18 बंधारे पाण्याखाली आहेत.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.