कोल्हापूर दि. २५ : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबवल्या जाणार्या योजनांचे सर्व्हेक्षण करुनत्याचा अहवाल सादर करा अशा सूचना सहकार, संसदीय कार्य तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज जिल्हा परिषदेच्या अधिकार्यांना दिल्या.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज झाली. पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामधाम येथे ही सभा झाली. त्यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे सूचना दिल्या.
त्यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत अनेक योजना राबवल्या जातात. पण त्याचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या जीवनाचा आर्थिक स्तर उंचावला आहे का याची जाणीव करुन घेण्यासाठी लाभार्थ्यांचे सर्व्हेक्षण करणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील किमान दहा टक्के लाभार्थ्यांचे सर्व्हेक्षण करण्यात येवून त्याचा अहवाल तयार करावा.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष हिंदुराव चौगले यांनी घरकुल योजनेतून बांधलेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी निधी देण्याची मागणी केली. मात्र अशाप्रकारे निधी देता येणार नसल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
एकात्मिक पडीक जमीन विकास कार्यक्रमात पाणलोटांचे काम पूर्ण करा. काम करताना ग्रामपंचायत सदस्याना विश्वासात घ्या, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. पन्हाळा तालुक्यातील वेतवडे येथील पाणलोटच्या कामाबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकार्यांमार्फत चौकशी करुन अहवाल सादर करण्याची सूचनाही त्यांनीदिली. याबाबत आमदार चंद्गदीप नरके यांनी सभेत मुद्दा उपस्थित केला होता.
सभेस गृह, ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक, आमदार चंद्गदीप नरके, जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, मुख्य कार्यकारीᅠअधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, महापालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी-प्रसन्ना, प्रकल्प संचालक पी. बी. पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.