कोल्हापूर, दि. 14 (जिल्हा माहिती कार्यालय)
: ‘भारत माता की जय!’ अशा घोषणा देत लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेले
उत्तरप्रदेशमधील 1 हजार 456 मजूर आज सायंकाळी श्रमिक विशेष रेल्वेने
उत्तरप्रदेशकडे रवाना झाले.
आजरा,
भुदरगड, चंदगड, गडहिंग्लज, हातकणंगले, राधानगरी, शाहूवाडी आणि शिरोळ या तालुक्यातील
1 हजार 456 मजुरांचा यामध्ये समावेश आहे. या सर्वांना 2 दिवसांच्या जेवणाची तसेच
नाश्ता आणि पाणी याचे किट वाटप करण्यात आले.
यावेळी हातकणंगल्याचे तहसिलदार प्रदिप उबाळे, सहायक कामगार आयुक्त अनिल
गुरव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते.
0 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.