कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील 5 निवारागृहांमध्ये राज्यातील 27 आणि
परराज्यातील 18 अशा एकूण 45 जणांची सोय करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत
देसाई यांनी दिली.
कोल्हापूर महानगरपालिका
क्षेत्रात शेठ रुईया विद्यालय, मंगळवार पेठ येथे राज्यातील 9 परराज्यातील 3 अशा 12 जणांचा समावेश असून
याची क्षमता 50 जणांची आहे.
करवीर
- सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी येथे परराज्यातील 5 एकूण 5 जण
असून क्षमता 70 जणांची आहे. डी. फार्मसी कॉलेज उजळाईवाडी येथे राज्यातील 3
परराज्यातील 10 असे एकूण 13 असून याची एकूण क्षमता 50 जणांची आहे.
शिरोळ- शाळा
क्रमांक 1 जयसिंगपूर येथे राज्यातील 12 असे एकूण 12 क्षमता 50 आहे.
गगनबावडा- समाज कल्याण निवासी शाळा वसतीगृह गगनबावडा येथे राज्यातील 3
असे एकूण 3 असून क्षमता 105 जणांची आहे.
यामध्ये कर्नाटकातील 2,
तामिळनाडूमधील 11,
केरळमधील 3,
आंध्रप्रदेश 2 अशा एकूण 4 राज्यातील 18 जणांचा तसेच
महाराष्ट्रातील 27 असे मिळून 45 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.