शुक्रवार, १५ मे, २०२०

जिल्ह्यातील 5 निवारागृहांमध्ये राज्यातील 27 परराज्यातील 18 -जिल्हाधिकारी दौलत देसाई




       कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय)  : जिल्ह्यातील 5 निवारागृहांमध्ये राज्यातील 27 आणि परराज्यातील 18 अशा एकूण 45 जणांची सोय करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
        कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात शेठ रुईया विद्यालय, मंगळवार पेठ येथे राज्यातील  9 परराज्यातील 3 अशा 12 जणांचा समावेश असून याची क्षमता 50 जणांची आहे.
       करवीर - सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी  येथे परराज्यातील 5 एकूण 5 जण असून क्षमता 70 जणांची आहे. डी. फार्मसी कॉलेज उजळाईवाडी येथे राज्यातील 3 परराज्यातील 10 असे एकूण 13 असून याची एकूण क्षमता 50 जणांची आहे.
          शिरोळ- शाळा क्रमांक 1 जयसिंगपूर येथे राज्यातील 12 असे एकूण 12 क्षमता 50 आहे.
          गगनबावडा- समाज कल्याण निवासी शाळा वसतीगृह गगनबावडा येथे राज्यातील 3 असे एकूण 3 असून क्षमता 105 जणांची आहे.
यामध्ये कर्नाटकातील 2,
तामिळनाडूमधील 11,
केरळमधील 3,
आंध्रप्रदेश  2 अशा एकूण 4 राज्यातील 18 जणांचा तसेच महाराष्ट्रातील 27 असे मिळून 45 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.