कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) : मागील वर्षी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतीचे फार नुकसान
झाले. पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 1 हेक्टर पर्यंतच्या पीक कर्जास
माफी देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला होता. यानुसार जिल्ह्यातील बाधित
क्षेत्रावरील कर्जमाफीसाठी 294 कोटी इतकी रक्कम प्राप्त झाली असून त्यापैकी 292.75
कोटींचे वाटप करण्यात आले, असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी दिली.
पूरबाधित
क्षेत्राचे चुकीचे पंचनामे व काही तांत्रिक अडचणीमुळे संयुक्त व सामायिक खातेदार
शेतकरी यांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता. हे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित होते.
याबाबत पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री
राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जिल्ह्यातील संयुक्त व सामायिक खातेदार शेतकऱ्यांना
या योजनेचा लाभ देण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक यांना दिले होते. त्यानुसार
जिल्हृयातील संयुक्त व सामायिक खातेदार यांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
जिल्ह्यातील
उर्वरित जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीय बँक व व्यापारी बँकांच्या पात्र वंचित
सभासदांना कर्जमाफीचा लाभ देण्याकरिता आवश्यक असलेल्या 25 कोटी रकमेची मागणी
शासनाकडे करण्यात आली आहे. लवकरच उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार
असल्याचेही त्यांनी सांगितले.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.