कोल्हापूर,
दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय) :
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या राज्याबाहेर जाणाऱ्या आणि राज्याबाहेरुन जिल्हयात
येणाऱ्या 42 हजार 393 व्यक्ती तर महाराष्ट्र राज्यातील अन्य जिल्हयामध्ये
जाणाऱ्या आणि महाराष्ट्रातील अन्य जिल्हयामधुन येणाऱ्या 19 हजार 89 व्यक्ती
असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
जिल्हयातून राज्याबाहेर जाणाऱ्या आणि
राज्याबाहेरुन जिल्हयात येणाऱ्या 42 हजार 393 व्यक्तींमध्ये राज्याबाहेर जाणाऱ्या
41 हजार 94 तर राज्याबाहेरुन जिल्हयात येणाऱ्या 1 हजार 299 व्यक्तींचा समावेश
आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातील अन्य जिल्हयामध्ये जाणाऱ्या आणि
महाराष्ट्रातील अन्य जिल्हयामधुन येणाऱ्या 19 हजार 89 व्यक्तींमध्ये महाराष्ट्र
राज्यातील अन्य जिल्हयामध्ये जाणाऱ्या 11 हजार 395 तर महाराष्ट्रातील अन्य
जिल्हयामधुन येणाऱ्या 7 हजार 694 व्यक्तींचा समावेश असल्याचेही जिल्हाधिकारी दौलत
देसाई यांनी सांगितले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.