कोल्हापूर, दि. 14 (जिल्हा माहिती कार्यालय) : लॉकडाऊनमुळे
जिल्ह्यात अडकलेले परराज्यातील 10 हजार 176 तर महाराष्ट्रातील 3 हजार 795 असे 13
हजार 971 जण आजअखेर त्यांच्या-त्यांच्या
गावांना रवाना झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
लॉकडाऊनमुळे
जिल्ह्यामध्ये परराज्यातील सुमारे 10 हजार 176 स्थलांतरित कामगार, विद्यार्थी,
पर्यटक, यात्रेकरु, प्रवासी आणि इतर नागरिक अडकले होते. यामध्ये उत्तरप्रदेशमधील
4452, मध्यप्रदेशमधील 1958, राजस्थानमधील 1556, बिहारमधील 1382, कर्नाटक 542,
तामिळनाडूमधील 234, पूर्वेकडील राज्य 34, केरळमधील 10, झारखंडमधील 2,
आंध्रप्रदेशमधील 1, पश्चिम बंगालमधील 1 आणि इतर 4 असे 10 हजार 176 जण रवाना झाले
आहेत.
महाराष्ट्रातील अन्य जिल्हयातील 3 हजार
795 जण लॉकडाऊनमुळे कोल्हापूर जिल्ह्यात अडकले होते, यामध्ये मुंबई शहर 50, मुंबई
उपनगर 4, ठाणेमधील 245, पालघरमधील 18, रायगडमधील 38, रत्नागिरीमधील 98,
सिंधुदुर्गमधील 76, सातारामधील 91, सांगलीमधील 975, सोलापूरमधील 210, पुण्यामधील
1192, नाशिकमधील 74, धुळे 39, जळगावमधील 30, नंदुरबारमधील 30, अहमदनगरमधील 110,
औरंगाबादमधील 7, बीड 94, जालनामधील 14, उस्मानाबादमधील 81, लातुरमधील 145, नांदेडमधील 67,
परभणीमधील 11, हिंगोली 27, अकोलामधील 1,
बुलढाणामधील 15, यवतमाळमधील 1, वाशिम 19, नागपूरमधील 19, चंद्रपूरमधील 13 आणि
गोंदियामधील 1 असे एकूण 3 हजार 795 जण
रवाना झाले आहेत.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.