कोल्हापूर दि. 19 (जि.मा.का.)
:- विधानसभा निवडणुकीसाठी सोमवार, 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार
घडू नये यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी मतदान केंद्राच्या
परिसरामध्ये मनाई आदेश जारी केला आहे.
निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून सदरची निवडणूक
प्रक्रिया विनाअडथळा व भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक
अधिकारी दौलत देसाई यांनी 1973 चे कलम 144 अन्वये जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार
संघाच्या हद्दित मतदानाच्या एक दिवस अगोदर म्हणजे दिनांक 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी
6 वाजल्यापासून ते मतदान दिवशी दिनांक 21 ऑक्टोबर रोजी मतदान संपेपर्यंत सर्व विधानसभा
मतदार संघासाठीच्या मतदान केंद्राच्या परिसरामध्ये मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरामध्ये
राजकिय पक्षांचे बुथ स्थापीत करणे, प्रचार साहित्य बाळगणे अथवा वापरणे. मतदान केंद्राच्या
100 मीटर परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तीने मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, वायरलेस सेट इत्यादी
बाळगणे, वापरणे, अथवा मतदानाच्या गोपनियतेचा भंग होईल अशी कृती करणे. (भारत निवडणूक
आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी व निवडणूक कामाशी निगडित कर्मचारी वगळून) मतदान केंद्रातील
मतदान प्रतिनिधी वा इतर प्रतिनिधी यांनी मतदान केंद्रामध्ये मोबाईल वापरणे किंवा फोटो
काढणे अथवा चित्रिकरणी करणे तसेच मतदानाच्या गोपनियतेचा भंग होईल अशी कृती करणे. मतदान
केंद्राच्या 100 मीटर परिसरामध्ये कोणत्याही प्रकारची शस्त्रे (शस्त्र अधिनियम
1959 मध्ये नमुद केले प्रमाणे) बाळगणे अशा प्रकारची कृती करण्यास मनाई केली आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव नेमलेले पोलीस अधिकारी/कर्मचारी वगळून सदर आदेशाचा
कोणत्याही प्रकारे भंग केल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम 188 प्रमाणे तसेच मतदान गोपनियतेचा
भंग झालेस लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील, असे आदेशामध्ये
नमुद करण्यात आले आहे .
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.