कोल्हापूर दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) : अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील ज्या व्यक्तींना अद्यापही स्वत:चे पक्के घर उपलब्ध झाले नाही अशा व्यक्तींनी अर्ज करावेत असे आवाहन समाजकल्याण विभागामार्फत
करण्यात आले आहे.
ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक यांच्यामार्फत संबंधीत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, शहरी भागासाठी संबंधित नगरपालिका / नगरपरिषद / नगरपंचायत यांचे मुख्याधिकारी तसेच महानगरपालिका क्षेत्रासाठी महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे विहीत नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रांसह तत्काळ अर्ज सादर करावेत.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.