कोल्हापूर,
दि. 18 (जि.मा.का.) : राधानगरी धरणामधून 1400 क्युसेक तर कोयना धरणामधून 2100
क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा
पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम.शिंदे यांनी आज सकाळी 7 वाजता दिली.
पंचगंगा नदीची
राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी
7 वाजता 24.3 फूट असून, एकूण 16 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी
धरणात आज अखेर 8.19 टीएमसी पाणीसाठा आहे. चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा कोदे
लघुप्रकल्प, पाटगाव व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
पंचगंगा
नदीवरील- राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर. भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे व खडक कोगे. तुळशी
नदीवरील- बीड, कासारी नदीवरील- यवलूज,
वारणा नदीवरील- चिंचोली दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सिद्धनेर्ली व
सुळकुड, असे एकूण 16 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या अलमट्टी धरणात 104.96 टीएमसी पाणी साठा आहे, तर कोयना धरणात 99.75 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे
पाणीसाठा आहे. तुळशी 3.46 टीएमसी, वारणा
32.46 टीएमसी, दूधगंगा 24.39 टीएमसी, कासारी 2.72 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी
2.62 टीएमसी, पाटगाव 3.72 टीएमसी, चिकोत्रा 1.47, चित्री 1.88 टीएमसी, जंगमहट्टी
1.22 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, कोदे (ल. पा.) 0.21 टीएमसी असा आहे.
बंधाऱ्यांची
पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 24.3 फूट, सुर्वे 25.4 फूट, रुई 58.3 फूट,
इचलकरंजी 55 फूट, तेरवाड 55 फूट, शिरोळ 53 फूट, नृसिंहवाडी 53 फूट, राजापूर 46.3 फूट तर नजीकच्या सांगली 16.6 फूट आणि
अंकली 24.3 फूट अशी आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.