रविवार, २५ ऑगस्ट, २०१९

आज अखेर 33 कोटी 49 लाख 90 हजार रोख सानुग्रह वाटप -जिल्हाधिकारी दौलत देसाई




        कोल्हापूर, दि. 25 (जि.मा.का.) : ग्रामीण भागातील 49 हजार 443 आणि शहरी भागातील 18 हजार 684 कुटुंबांना रोख 5 हजार रुपये प्रमाणे आज अखेर 33 कोटी 49 लाख 90 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
            सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आलेली तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे - करवीर ग्रामीण 8 हजार 868 शहरी  7 हजार 595 कुटुंब 7 कोटी 66 लाख 70 हजार, कागल ग्रामीण 1 हजार 776 कुटुंब शहरी भागात 61 कुटुंब 91 लाख 85 हजार, पन्हाळा ग्रामीण  875 कुटुंब 43 लाख 75 हजार, शाहुवाडी ग्रामीण 399 शहरी 53 कुटुंब 22 लाख 60 हजार, हातकणंगले ग्रामीण  8 हजार 715 शहरी  4 हजार 577 कुटुंब 6 कोटी 64 लाख 60 हजार, शिरोळ ग्रामीण  26 हजार 664  शहरी  6 हजार 222 कुटुंब  16 कोटी 44 लाख 30 हजार, राधानगरी ग्रामीण 747 कुटुंब 37 लाख 35 हजार, भुदरगड ग्रामीण 147 कुटुंब 7 लाख 35 हजार, गगनबावडा ग्रामीण 101 कुटुंब संख्या 5 लाख 5 हजार  व 83 कुटुंबाना 4 लाख 15 हजार धनादेशाव्दारे जमा केले, गडहिंग्लज ग्रामीण 917 शहरी  168 कुटुंब 54 लाख 25 हजार, आजरा ग्रामीण  38 व शहरातील 8 कुटुंब 2 लाख 30 हजार व ग्रामीण 38 व शहरातील 8 कुटुंबाना 2 लाख 70 हजार धनादेशाव्दारे जमा केले आणि चंदगड ग्रामीण 196 कुटुंबाना  9 लाख 80 हजार असे एकूण 33 कोटी 49 लाख 90 हजार अनुदानाचे वाटप करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.