शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१९

369 गावांमधून 1 लाखावर कुटुंबातील 4 लाख 7 हजार 134 जणांचे स्थलांतर -जिल्हाधिकारी दौलत देसाई




            कोल्हापूर दि.16 (जिमाका)  :-जिल्ह्यातील पूरपरिस्थितीच्या काळात आतापर्यंत 369 गावांमधून 1 लाख 2 हजार 441 कुटुंबातील 4 लाख 7 हजार 134 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
            जिल्ह्यातील 369 गावांमधून  1 लाख 2 हजार 441 कुटुंबातील सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केलेल्या 4 लाख 7 हजार 134 व्यक्तींची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे आहे.  शिरोळ – 42 गावातील 49 हजार 732 कुटुंबातील 1 लाख 84 हजार 4 सदस्य, कागल - 35 गावातील 1 हजार 856 कुटुंबातील 8 हजार 204 सदस्य, राधानगरी – 22 गावातील 757 कुटुंबातील 3 हजार 651 सदस्य, गडहिंग्लज – 27 गावातील 1 हजार 561 कुटुंबातील 6 हजार 366 सदस्य, आजरा–24 गावातील 97 कुटुंबातील 374 सदस्य, भुदरगड – 19 गावातील 234 कुटुंबातील 972 सदस्य, शाहुवाडी – 25 गावातील 442 कुटुंबातील 2 हजार 151 सदस्य, पन्हाळा – 47 गावातील 935 कुटुंबातील 4 हजार 934 सदस्य, , हातकणंगले – 23  गावातील 21 हजार 329  कुटुंबातील 93 हजार 608 सदस्य, करवीर – 56 गावातील 10 हजार 143 कुटुंबातील 52 हजार 982 सदस्य, गगनबावडा– 18 गावातील 87 कुटुंबातील 241 सदस्य, चंदगड – 30  गावातील 555 कुटुंबातील 2 हजार 644 सदस्य तर महापालिकेच्या माध्यमातून 14 हजार 713 कुटुंबातील 47 हजार 3 जणांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
००००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.