कोल्हापूर
दि. 18 (जिमाका) : एकूण
375 गावांमधून 1 लाख 2 हजार 568 कुटुंबातील 4 लाख 7 हजार 578 व्यक्तींचे आजअखेर सुरक्षित
स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. सध्या मोठ्या प्रमाणात पाणी ओसरल्याने संक्रमण शिबीरातील
पूरग्रस्थांनी आपल्या गावामध्ये मार्गक्रमण सुरु केले आहे. त्यामुळे आज एकूण 26 संक्रमण
शिबीरात 2 हजार 337 पूरग्रस्त आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
तालुकानिहाय कुटुंब आणि सदस्य संख्या पुढीलप्रमाणे
- कागल - 36 गावातील 1 हजार 856 कुटुंबातील 8 हजार 204 सदस्य, राधानगरी – 22 गावातील
757 कुटुंबातील 3 हजार 3651 सदस्य, गडहिंग्लज – 27 गावातील 1561 कुटुंबातील 6 हजार
366 सदस्य, आजरा– 24 गावातील 97 कुटुंबातील 374 सदस्य, भुदरगड – 23 गावातील 244 कुटुंबातील
977 सदस्य, शाहुवाडी – 25 गावातील 442 कुटुंबातील 2 हजार 151 सदस्य, पन्हाळा – 47 गावातील
982 कुटुंबातील 4 हजार 934 सदस्य, शिरोळ – 42 गावातील 49 हजार 732 कुटुंबातील 1 लाख
84 हजार 4 सदस्य, हातकणंगले – 23 गावातील 21 हजार 329 कुटुंबातील 93 हजार 608 सदस्य,
करवीर – 56 गावातील 10 हजार 154 कुटुंबातील 53 हजार 29 सदस्य, गगनबावडा– 19 गावातील
116 कुटुंबातील 520 सदस्य, चंदगड – 30 गावातील 585 कुटुंबातील 2 हजार 757 सदस्य तर
महापालिकेच्या माध्यमातून 14 हजार 713 कुटुंबातील 47 हजार 3 जणांचे स्थलांतर करण्यात
आले. जिल्ह्यात आज एकूण 26 संक्रमण शिबीरात 2 हजार 337 पूरग्रस्त आहेत. यामध्ये शिरोळमधील
11 शिबीरात 951, कोल्हापूर शहरातील 5 शिबीरात 408, इचलकरंजी शहरातील 8 शिबीरात 800 आणि गडहिंग्लज मधील
2 शिबीरात 178 जणांचा समावेश आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.