कोल्हापूर, दि. 18 (जिमाका)- पूरग्रस्तांना साथीचे
रोग होवू नयेत म्हणून शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानतर्फे २५ जणांचे वैद्यकीय
पथक १० लाख रुपयांच्या औषधांसह दाखल झाले होते. सुमारे ५ हजारहून अधिक लोकांची
तपासणी करुन या पथकांने औषधोपचार केले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी
संजय शिंदे यांनी आज दिली.
मनोरमाच्या संचालक अश्विनी दानिगोंड
यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांसाठी शिर्डी संस्थानचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी
अध्यक्षांकडे मदत निधीची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीनुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी
१ कोटीची मदत मिळाली.
शिर्डी
देवस्थानने २५ जणांचे वैद्यकीय पथक १० लाख रुपयांच्या औषधांसह जिल्ह्यांसाठी
पाठवले होते. मनोरमाच्या प्रतिनिधी सोनल शिर्के, देवस्थानचे डॉ. सचिन बागडे यांच्या
पथकांने दोन्ही जिल्ह्यांतील ५ हजाराहून अधिक पूरग्रस्तांची तपासणी करुन औषधोपचार केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.