कोल्हापूर
दि.14 (जिमाका) :-जिल्ह्यातील पूरपरिस्थितीच्या
काळात आतापर्यंत 321 गावांमधून 90 हजार 368 कुटुंबातील 3 लाख 58 हजार 91 व्यक्तींचे
सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.
जिल्ह्यातील 321 गावांमधून 90 हजार 368
कुटुंबातील सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केलेल्या 3 लाख 58 हजार 91 व्यक्तींची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे आहे. शिरोळ – 42 गावातील 49 हजार 732 कुटुंबातील 1 लाख
84 हजार 4 सदस्य, कागल - 35 गावातील 1 हजार 848 कुटुंबातील 8 हजार 192 सदस्य, राधानगरी
– 21 गावातील 746 कुटुंबातील 3 हजार 615 सदस्य, गडहिंग्लज – 15 गावातील 936 कुटुंबातील
4 हजार 3 सदस्य, आजरा–24 गावातील 97 कुटुंबातील 374 सदस्य, भुदरगड – 19 गावातील
234 कुटुंबातील 972 सदस्य, शाहुवाडी – 24 गावातील 427 कुटुंबातील 1 हजार 962 सदस्य,
पन्हाळा – 44 गावातील 879 कुटुंबातील 4 हजार 188 सदस्य, , हातकणंगले – 23 गावातील 21 हजार 329 कुटुंबातील 93 हजार 608 सदस्य, करवीर – 55 गावातील
8 हजार 227 कुटुंबातील 33 हजार 315 सदस्य, गगनबावडा– 2 गावातील 50 कुटुंबातील 241 सदस्य,
चंदगड – 16 गावातील 222 कुटुंबातील 1 हजार
284 सदस्य तर महापालिकेच्या माध्यमातून 5 हजार
641 कुटुंबातील 22 हजार 333 जणांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
००००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.