एसटी मार्ग बंद
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्व एस.टी. फेऱ्या बंद
- विभाग नियंत्रक रोहन
पलंगे
कोल्हापूर, दि. 10
(जि.मा.का.) : अतिवृष्टीमुळे सर्व मार्ग बंद झाल्याने कोल्हापूर, संभाजीनगर,
इचलकरंजी, गडहिंग्लज, गारगोटी, मलकापूर, चंदगड, कुरुंदवाड, कागल, राधानगरी,
गगनबावडा व आजरा या बाराही आगारातील सर्व एस.टी. फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात
अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे वाहतुकीचे सर्व मार्ग पाण्याखाली गेले आहेत,
त्यामुळे जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील येणाऱ्या सर्व आगारातील एस.टी. फेऱ्या बंद
ठेवण्यात आल्या आहेत. अशी माहिती विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.