गुरुवार, २ जानेवारी, २०२०

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कारासाठी 31 जानेवारीपर्यंत प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन



 कोल्हापूर, दि. 02 : मराठी भाषेतील उत्कृष्ठ वाड:मय निर्मितीसाठी राज्य शासनाच्यावतीने स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार योजना जाहीर झाली असून यासाठी प्रवेशिका 31 जानेवारी 2020 पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिवांनी केले आहे.
मराठी भाषेतील उत्कृष्ठ वाड:मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2019 करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कारासाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून) तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक 1 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत पाठविता येणार आहेत. दिनांक 1 जानेवारी  ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत,दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी मुंबई 400025 यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात(सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध होतील. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर 'नवीन संदेश' या सदरात स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार 2019 नियमावली व प्रवेशिका या शीर्षाखाली व 'What's new Late Yashwantrao Chavan State Literature Award 2019 Rules Book and Application Form या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य  आणि संस्कृती मंडळाच्या https://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका  व नियमपुस्तिका उपलब्ध होतील.
प्रवेशिका पूर्णत: भरून आवश्यक कागदपत्रांसह सचिव,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक 1 जानेवारी ते 31 जानेवारी या विहित कालावधीत पोहचतील अशा पाठवाव्यात. लेखक/प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करू शकतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक/ प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत,दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी मुंबई 400025 येथे पाठवाव्यात. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून अन्य ठिकाणच्या लेखक/प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रवेशिका व पुस्तकांच्या दोन प्रती दिनांक 1 जानेवारी ते 31 जानेवारी  या विहित कालावधीत पाठवाव्यात.
 लेखक /प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशका व पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफ्यावर/पाकीटावर स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार 2019 साठी प्रवेशिका असा स्पष्ट उल्लेख  करावा. प्रवेशिका व पुस्तके स्विकारण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी  हा राहिल. विहित कालावधीनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्विकारल्या जाणार नाहीत.
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.