कोल्हापूर, दि. 29 (जि.मा.का.) : विद्यार्थ्यांनी वाहतुक नियमांचे काटोकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश पंकज देशपांडे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत प्रमुख जिल्हा न्यायाधीश वृषाली जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स. म. लोहिया, ज्युनिअर कॉलेज येथे वाहतुक नियम साक्षरता शिबीराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होत. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. वाहतुक विभागाचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मंगेश गुरव
श्री. देशपांडे म्हणाले, सध्या अपघाताचे प्रमाण वाढले असून तरुणांनी वाहतुक नियमांचे पालन करणे खुप आवश्यक आहे. त्याकरीता वाहनाचा वेग नियंत्रित असणे आवश्यक आहे. एखाद्या अपघातामुळे कुटुंबाची वाताहात होते. विद्यार्थ्यांनी सिग्नलचे पालन करणे आवश्यक आहे.
पोलीस निरीक्षक श्री. बाबर यांनी विद्यार्थ्यांना इंटर सेफ्टर व्हेईकलची माहिती दिली. या वाहनामध्ये लेझर स्पीडगन उपलब्ध असून 300 मीटरपर्यंत गाडीचा वेग तपासला जातो. टिंट मीटर मशीनद्वारे चारचाकी वाहनास काळी काच असल्यास तपासणी केली जाते तसेच या वाहनामध्ये ब्रेथ ॲनालाईझर मशीन उपलब्ध असून त्याद्वारे वाहनचालकांनी मद्य सेवन केले आहे का याबाबत तपासणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मंगेश गुरव यांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगून वाहन चालविताना सुरक्षितपणे वाहन चालवणे व हेल्मेटचा वापर करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्रीमती एस. एस. चव्हाण यांनी केले. सुत्रसंचालन सागर बगाडे तर आभार प्रदर्शन व्हाईट आर्मीचे अध्यक्ष अशोक रोकडे यांनी केले. कार्यक्रमास स्कूल कमिटी सदस्य प्रशांत लोहिया, उपप्राचार्य अनिल सुर्यवंशी, शिक्षक व इतर कर्मचारी,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी ज्ञानेश्वर मिरजकर, अनिकेत मोहिते, सागर गोते उपस्थित होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.