कोल्हापूर, दि. 6 (जिमाका) : शिरोळ तालुक्यातील सर्व पात्र अंत्योदय व प्राधान्य
गटातील शिधापत्रिकाधारक/ लाभार्थी यांनी प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला तसेच 7 ते
15 तारखेपर्यंत धान्याची संबंधित रास्त भाव धान्य दुकानातून उचल करावी, असे आवाहन शिरोळच्या
तहसिलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांनी केले आहे.
शिरोळ
तालुक्यामध्ये अंत्योदय 4642व प्राधान्य गटातील 55169 इतके पात्र शिधापत्रिकाधारक
आहेत. त्यांना धान्याचे वाटप करण्यासाठी
संबंधित रास्त भाव धान्य दुकानदारांना प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेपूर्वी
धान्य पोहोच करण्यात येते. शासनाकडून प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेस अन्नदिन व 7
ते 15 तारखेपर्यंत अन्न सप्ताह साजरा करण्यात येतो. या अन्नदिन व अन्न सप्ताहाचा
उद्देश साध्य होण्यासाठी व जास्तीत-जास्त पात्र लाभार्थींना त्याचा लाभ होण्यासाठी
लाभार्थ्यांनी 7 तारखेपर्यंत धान्याची उचल करावी.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.