इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

रविवार, २९ मार्च, २०२०

पत्र देवून संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या लोकप्रतिनिधीसह संबंधितांवर होणार गुन्हा दाखल पत्रासह वाहनेही होणार जप्त : जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश



        कोल्हापूर, दि. 29 (जि.मा.का)  :  लोकप्रतिनिधी, विविध संस्था आणि प्रतिष्ठित व्यक्ती पत्र देवून बाहेरुन जिल्ह्यामध्ये लोकांना पाठवित आहे. यामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचे आणि जिल्हा बंदीचे उल्लंघन होत आहे, अशा लोकप्रतिनिधी, संस्था तसेच संबंधित व्यक्ती यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. यामध्ये पत्रासह संबंधिताचे वाहनही जप्त होणार आहे.
            कोरोना प्रतिबंधक उपाय योजनेसाठी जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदी मध्ये जिल्हा बंदीही लागू  करण्यात आली आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, मागील काही  दिवसांपासून असे निदर्शनास आले आहे, जिल्ह्याबाहेरील काही प्रतिष्ठित व्यक्ती, संस्था, काही जबाबदार लोकप्रतिनिधी जिल्हाबाहेरील काही व्यक्तींना पत्र देत आहेत. अशा व्यक्ती निरनिराळ्या तपासणी नाक्यांवर पत्र दाखवून जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत येत आहेत आणि जिल्ह्यामध्ये प्रवेश देण्यासाठी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करीत आहेत.
            कुठल्याही संस्था, लोकप्रतिनिधी यांनी अशी बेकायदेशीर पत्रे देवून संचारबंदीचे उल्लंघन करु नये असे सांगून जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, अशा व्यक्ती जिल्ह्यामध्ये अचानक आल्याने जिल्ह्यामध्ये संसर्ग वाढून जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमोडून पडेल. असे प्रकार घडलेले आहेत. या विरुध कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना निर्देश दिले आहेत. संस्था, प्रतिष्ठित व्यक्ती, लोकप्रतिनिधी यांनी अशी पत्र देवून नयेत. अशी पत्रे दिली असल्यास त्वरित मागे घ्यावीत. मागे घेतली नाहीत तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
0000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.